नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत काही खास अश्या विरह कविता ज्या की तुम्हाला नक्की आवडती. Virah दुरावा नेहमीच त्रास दायक असतोच. आपल्या प्रियकरापासून दूर राहण खूप अवघड असत आणि हे भाव व्यक्त करण्यासाठी कविता हे खूप भारी माध्यम आहे. आम्ही अश्याच कविता आपल्या साठी घेऊन आलो आहे ज्या की मराठी कवींनी लिहल्या आहेत.
आम्ही सर्व कविता वेग वेगळ्या माध्यमातून गोळा केल्या आहेत तरी आपण या गोष्टी ची नोंद घ्यावी. तुम्ही जर या कवितेचे लेखक असाल आणि जर तुम्हाला ही कविता इथून हटवायची असेल तर आम्हाला कमेन्ट द्वारे नक्की कळवा आम्ही लवकरात लवकर तुमची कविता इथून हटवू. जरी तुम्हाला कविता पाठवायची असेल तरी देखील तुम्ही आम्हाला पाठऊ शकता
विरह
आता परत नाही जायचे त्या शहरात
जिथे आपलं मन रमत नाही
तु रहा नेहमी खुश पण
मला तुझ्याशिवाय जमत नाही
जिच्यासाठी सोडली साथ माझी
राहो नेहमी जोडी तिची तुझी
आता राहील ना आयुष्यात तुझ्या
परत ना ये जीवनात माझ्या
माझी साथ सोडली तशी नको सोडू तिची
नाहीतर स्वप्न राहतील अपूर्ण तुझ्या आयुष्याची
नवी सुरुवात नव्या जीवनाची
धडपड फक्त स्वतःसाठी जगण्याची
आता ना कोणासाठी झुरण्याची
ओढ फक्त आता आनंदी राहण्याची
-Wr.Pallavi
कवि मन पुन्हा जागी झालं
कवि मन पुन्हा जागी झालं
पुन्हा कविता करायला लागलं
पूर्वी प्रेम कविता करू लागलेलं
आता विरह गीत लिहायला लागलं
याला सर्वस्वी मीच जबाबदार
मग कोणावर रागे भरणार
रागे भरण्याचा पूर्ण अधिकार
तिचाच तर असणार
कवितांचा मीच गीतकार
मीच श्रोता असणार
एकदा तरी माझी कविता वाचणारं
माझ प्रेम पुन्हा डोकावणार?
-स्वरचित
सुनीत Sonnet
🌸🌸🌸🌸🌸🌸
भान
भान हरवायला काही नाही…
समोर आल्यावर तू,
मी भानावर असले पाहिजे…
डोळ्यात डोळे टाकून तुझ्या,
मला बघता यायला पाहिजे…
ओठांत दाटून आलेलं शब्द,
तुझ्यासमोर व्यक्त करता आले पाहिजे…
ओसरलेला स्पर्श तुझा,
मला अनुभवता आला पाहिजे…
नवखी नाही मी,
पण तुला मला ओळखता आलं पाहिजे…
भान हरवायला काही नाही,
पण तुझ्यासमोर मला भानावर राहता आलं पाहिजे….
🌸🌸🌸🌸🌸🌸
झुरणं
जगायचं म्हणून जगतेय
या जगण्याला काय अर्थ आहे,
नुसतेच भाळणे तुझ्यावर
या भाळण्याला कोणते नाव आहे,
तुझं वावरणं साऱ्यात असतं
माझी फक्त सावली सोबत आहे,
बहरत जावं आयुष्य तुझं
माझं आयुष्य मला तुझ्यात दिसते आहे,
अपेक्षा नसतेच भावनेला
भावनाहीन झुरणं किती कठीण आहे…
🌸🌸🌸🌸🌸🌸
कोण्या देवाची शप्पथ घालू तूच सांग,
कोण्या वळणावर मी तुझी वाट नाही
बघितली तूच सांग,
रिते होते आयुष्य सारे
तुझ्या येण्याने ते पूर्ण झाले,
कोण्या भाषेत तुला समजावून सांगू
तूच सांग …!
-लिना
🌸🌸🌸🌸🌸🌸
मनातलं सर्व माझ्या
तिलाकेव्हापासून सांगायचं होतं
सांगताच ती लाजून म्हणाली
मला तर आधीच माहीत होतं.
🌸🌸🌸🌸🌸🌸
कोरे ठेऊन पान मनाचे
आठवणीत का बोलतेस
बंद दरवाजे मिलनाचे
स्वप्नातच का भेटतेस.
🌸🌸🌸🌸🌸🌸
अश्रू फुले विरहाची
विरहात रात्र रात्र
सरली आठवणीत
कधीकाळी होता एक
प्रियकर तो मनात…
शपथ घेतली होती
कधी भावी मिलनाची
मार्गच आता चुकला
दोर तुटली भाग्याची…
शांत त्या सागरतीरी
काढले नाव वाळूत
किना-याला यावी लाट
गेले घेऊन ते आत…
बाग ती बहरलेली
राघू-मैना त्यात होते
आता एकटीच मैना
विरहाचे गीत गाते…
संकटे असावी तिथे
साथ असता दोघांची
ईश्वरा नसावी अशी
“अश्रू फुले विरहाची”
श्री सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
🌸🌸🌸🌸🌸🌸
सांगायचे होते तुजला
खेळ ते विरहाचे होते
क्षणात नाते आपले
विलग झाले होते.
🌸🌸🌸🌸🌸🌸
टिक टिक घड्याळाची
करिते क्षणांस जाचक,
होत नाही महन ते एकटेपण,
आठवणींच्या दुनियेत रमून,
होते भूतकाळाचे चित्रीकरण
नयन मिटताच….
ते रूप तुझे,तो सहवास
तुझा,ते दुःख तुझे,
ती काळजी तुझी,
जणू भासते ती व्हावी
आत्ताच परिधान,
पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो
थेंबांचा प्रवाह नयन उघडताच…
🌸🌸🌸🌸🌸🌸
मनाच्या खोल कुठेतरी
विचारांचं खळबळ माजलयं…
विरहाचं धुकं नात्यात दाटलयं
अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी
तुला दिलेल्या एका वचनापायी
गालांवरच्या खोट्या हास्यात
मी त्यांना अडवलंय.
🌸🌸🌸🌸🌸🌸
तुझी मिठी म्हणजे
चंद्र चांदण्यांचा भास
मिलन ह्रदयाचा व्हावं
एकत्र येऊन तुझा-माझा श्वास..
🌸🌸🌸🌸🌸🌸
काय सांगू
काय सांगू
त्या जुन्या आठवणीं कवटाळून जगतो आहे
हसऱ्या चेहऱ्याच्या मागे
खरा चेहरा लपवतो आहे
एक स्वर तुझा पडावा
कानी म्हणून झुरतो आहे
मला तू दिलेला प्रत्येक आवाज
मजला आजही वाटतो कोकिळे समानत्या सुमधुर आवाजस
मी पोरका झालो
माझीच ती चूक हाती
कोणास दुसने देनार
त्याची शिक्षा फार भोगली
माफी मागण्याची सोयच नाहीतुझ नाव कानी पडताच
नजर स्वैरभैर न्याहळते चेहरे
त्या चेहऱ्याआड दुसऱ्याचा
चेहरा पाहून मन खिन्न
पुनः नव्या दमाने नाव तुझं
ऐकण्या मनात हुरहूर
काय सांगू त्या जुन्या
आठवणीं कवटाळून जगतो आहे
हसऱ्या चेहऱ्याच्या मागे
खरा चेहरा लपवतो आहे
एक स्वर तुझा पडावा
कानी म्हणून झुरतो आहे-स्वरचित
सुनीत Sonnet
🌸🌸🌸🌸🌸🌸
घटका विरहाची भरली
विरहाची सांगता होत आहे
तुझ्या माझ्या प्रेमाचा बंध
नव्याने एक होत आहे.
🌸🌸🌸🌸🌸🌸
आता तरी होशील का माझी…
तुला राणी माझी बनवीनएकांतात शांत बसला असतान
तुझी प्रतीमा आली डोळ्या समोरून
तुझ्यात मी सारं गेलो हरवून
स्वतःला सारं बसलो विसरून ||तुझे नी माझे दोन मन मिळून
एकच विचार सदा घडवून
शब्दांचा खेळ सारा रंगवून
शब्द मनात जातात खोलवर रूजून ||तुझ्या आठवणीने सार मन जातं फुलून
कधी हसवून तर कधी जात हरवून
तुझ्या गजऱ्याचा सुगंध जातो दरवळून
राणी तुझ रूप दिसत फुलून ||तुझ्या एका भेटीसाठी आतूर मि होईन
ही एक भेट गाठ यावी घडून
तुझे ते रूप गोजिरे डोळे भरून पाहिन
तुझ्या भेटीचे ते सारे क्षण ठेवीन साठवून ||
कवी:- हरिष नैताम
🌸🌸🌸🌸🌸🌸
तिच्या सैलसर मिठीत
जेव्हा माझेपण वितळत होते
तिच्या साऱ्या मौनांचे जणू
मज भाषांतर उमगत होते
रात्र सरली कळत नकळत
निःशब्द मोगऱ्याचा दरवळ
केवढे तिला सांगायचे असते
स्पर्शात उमगली हिरवळ
© संदीप राऊत
🌸🌸🌸🌸🌸🌸
माझं ही प्रेम आहे तुझ्यावर
टाइमपास असं काही नाही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
बावरे मन हे माझे..
फक्त तुलाच शोधत राही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
समजतंय रे तुझ्या भावना..
मलाही आता करमत नाही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
मित्र असतात अवतीभोवती..
नजर मात्र तुलाच शोधात राही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
तू दूर निघून गेलास
कारण मात्र सांगितले नाहीस..2
तुझ्याशिवाय हे वेडे मन
कोणाचाही विचार करत नाही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
विसरली नाही रे राज्या तुला
शंका तू घेऊ नकोस काही..2
अरे तुझ्या सुखासाठी मंदिरात
देवापुढे रोज मी फुले वाही..2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
लपवत नाही रे राज्या
आता सांगते तुला सर्वकाही.2
💞💕💞💕💞💕💞
-Sagar Rokade
🌸🌸🌸🌸🌸🌸
मी म्हणालो आरसा
वृत्त : मेनका
लगावली : गालगागा गालगागा गालगा
जीवनाला मी म्हणालो आरसा
आयुष्याला मी म्हणालो आरसा
**
चालताना हासते तू कायशी
चालण्याला मी म्हणालो आरसा
**
चांदण्याच्या सोबतीला चांदणी
या नभाला मी म्हणलो आरसा
**
प्रीत माझी लाजरीशी बासरी
बासरीला मी म्हणालो आरसा
**
सांग माझ्या या मनाला चांगले
या मनाला मी म्हणलो आरसा
**
तू जराशी लाजरी का बावरी
लाजण्याला मी म्हणालो आरसा
**
आवडीने या प्रकाशाला पहा
या गझलेला मी म्हणालो आरसा
**
प्रकाश साळवी
बदलापुर – ठाणे
🌸🌸🌸🌸🌸🌸
आज काल
होतो जसा काल मी
आजही तसाच आहे |
कालही एकटाच होतो
मी आजही एकटाच आह ||
आज काल इथे आम्ही दोघच असतो
माझा एकांत आणि मी ,
तासन तास दोघं बोलत बसतो
आठवणींच्या विश्वात हरवत असतो…|
आठवणीचे विश्वात तुला शोधता शोधता
पापण्यात पाणी दाटून येते..||
शेवटी मनाला हेच समजावतो ,
जीवन हे असच जगायचं असतं
दुःख घेऊन सुख वाटायचं असतं ..
जीवन – मरण हे फक्त कोड आहे
जाता – जाता हे सोडवायचं आहे……|||
-Hardik D. Shah
Mumbai
🌸🌸🌸🌸🌸🌸
तुला यायचे येऊन जा रे
तुला यायचे येऊन जा रे
घरी आपल्या घेऊन जा रे
**
सय येते कितीदा तरी
पुन्हा एकदा भेटून जा रे
**
फुले चार घेऊन जा तू
जरा गंध तू देऊन जा रे
**
फुलव मनाचा पिसारा रे
जरा अंगणी नाचून जा रे
**
बरसावे वाटते आजराणी
मनाला जरासा भिजवून जा रे
**
तमाच्या नभातून बाहेर तू
प्रकाशास घेऊन तू जा रे
प्रकाश साळवी
बदलापुर -ठाणे
🌸🌸🌸🌸🌸🌸
मस्त कविता आहेत
nice